वारकरी हे सर्वसामान्यांपेक्षा आनंदी – संशोधनातून खुलासा !

By Prathamesh Suryavanshi

Updated on:

वारकरी

संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा महासागर असणारी आषाढी वारी, केवळ धार्मिक सोहळाच नाही तर मानसिक समाधान, सामाजिक एकोपा आणि जीवनातील आनंदाचा अद्वितीय अनुभव देणारा उत्सव आहे. ही भावना आता फक्त भावना नसून अभ्यासातून सिद्ध करून दाखवले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील संशोधक डॉ. गणेश टेकळे यांनी प्रा.डॉ. राहुल म्होपरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की आषाढी वारीत सहभागी होणारे वारकरी हे सर्वसामान्य लोकांपेक्षा अधिक आनंदी आणि समाधानकारक जीवन जगत आहेत व हे वैज्ञानिकदृष्ट्या निष्पन्न झाले आहे.

“हॅप्पीनेस इंडेक्स ऑफ वारकरी संप्रदाय” वर आधारित अभ्यास

शिवाजी विद्यापीठाच्या Ph.D. संशोधन प्रकल्पामध्ये ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ या संकल्पनेच्या आधारे वारीतील सहभागी वारकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासात अनेक घटकांचा विचार करण्यात आला ,जसे की:

  • मानसिक समाधान
  • सामाजिक संबंध
  • आध्यात्मिक अनुभव
  • ताण-तणाव
  • स्वयंप्रेरणेने मिळणारा आनंद

या सर्व घटकांमध्ये वारकऱ्यांनी उच्च गुण मिळवले, तर सर्वसामान्य शहरातील नागरिक तुलनेने अधिक तणावग्रस्त व असमाधानी असल्याचे स्पष्ट झाले.

भक्तीचा अनुभव म्हणजे अंतःकरणातील शांती

वारीमध्ये हजारो किलोमीटर पायी चालत जाणाऱ्या या भक्तांची मानसिकता ही “विठोबा माझा मायबाप” अशा दृढ श्रद्धेवर आधारित असते. हेच त्यांना ताणतणावापासून दूर ठेवते. ‘नामस्मरण’, ‘भजन’, ‘किर्तन’, ‘सामूहिक भोजन’ आणि ‘दिंडीतले सहकार्य’ यामुळे त्यांना एक विशेष आध्यात्मिक समाधान मिळते.

शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, वारकरी संप्रदायाची सामूहिकता, सहजीवन, आणि सेवा-भावना ही मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे हे लोक रोजच्या धावपळीतून दूर जाऊन एक वेगळाच आनंद अनुभवतात.

या संशोधनाच्या आधारावर अनेक न्यूज चॅनेल्स आणि पोर्टल्सनी वारकऱ्यांच्या ‘आनंदमय जीवनशैली’वर आधारित विशेष व्हिडिओ रिपोर्ट दाखवले. या व्हिडिओंमध्ये वारकऱ्यांचे अनुभव, त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि “पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी आम्ही काहीही सहन करतो” असे भावनिक संवाद दिसले.

या अभ्यासातून हे स्पष्ट होते की धार्मिक श्रद्धा, सामाजिक सहभाग, आणि आध्यात्मिक अनुभव हे आयुष्यातील खरे आनंद देणारे घटक आहेत. आषाढी वारी ही याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. शिवाजी विद्यापीठाच्या या संशोधनाने केवळ वारीचा महिमा अधोरेखित केला नाही, तर भारतीय आध्यात्मिकतेच्या सामाजिक परिणामांवर एक अभ्यासपूर्ण दृष्टी दिली आहे.

आपणही कधी वारीत सहभागी झालात का? तुमचा अनुभव आम्हाला कळवा आणि मराठी संस्कृतीचा हा भाग अधिक लोकांपर्यंत पोचवा.

Prathamesh Suryavanshi

Research student at Shivaji University, Kolhapur

Leave a Comment